Thursday, June 16, 2016

Last night I experienced Sweet Pain


Since Friday afternoon till yesterday morning I was really unwell. Cough, cold, body ache, fever, sneezing and resulting fatigue. There was no question of traveling and so I was resting at home.
And since his dad was home, my boy who will turn 3 in October, wanted to play with me. The tiger wanted to bite me, his 'King' fu Panda wanted to snuggle down in my bed, Batman, Superman and Spiderman were all combined in one and they had one common enemy; poor man resting.

And I was doing all that could to keep all these guys away as I didn't want them to catch cold. Initially I was doing it nicely. But this guy is pretty adamant and has now learned to tackle things.

"का लांब राहू बाबा" (why should I keep away, dad?),
"मी तुमच्याकडे नाही येतेय, मी तर तिकडे चाललोय." (I'm not coming near you, I'm going that way...).

But all this while, he was lingering around my bed.

Then I pulled out a leather belt.

Hold on...

Chiding this guy by showing him leather belt is like placing a scarecrow in front of those stubborn birds who eventually build their nests in its hollow chest as they know this thing never bites and never will.

But with my overacting I somehow managed to keep him away. For three days.

I told him that I will let him near me when MY COLD GOES AWAY (माझी सर्दी गेल्यावर तुला जवळ घेणार).
Three days went by.

Yesterday, after I finished my dinner, I was washing my dish. My wife was getting him ready to go to bed when she heard the 'sink' sound and said, "stop that, you will catch cold again...".

I replied,
”अगं गेलीय माझी सर्दी, डोंट वरी” (“cold is gone, don't worry...").

And the moment I finished my sentence, I heard my boy running towards the kitchen.

He stood at the door and said,"
आता तुम्ही मला जवळ घेणार बाबा? आता मी तुमच्या जवळ येऊ शकतो?" (Will you hold me close now Baba; may I come near you now?).
...

The feeling that followed instantly, when you jaw become heavy without having a cardiac arrest, your eyes become moist, little choking feeling in your throat and despite all this physical discomfort, you feel blessed for experiencing the moment, real special feeling, when you know someone loves you just for being you irrespective of anything and everything else...
, when you know your passing statement is being registered so sincerely and means so much to someone… and that someone is so so so sweet! … is called "sweet pain".

You don't need to be Nostradamus to predict how tightly I held him yesterday!

May God keep you all blessing with little sweet pain once in a while, stay blessed!   

Regards,
Saumitra Salunke Thursday, 16th June 2016

Wednesday, June 8, 2016

सैराट झालं जी...

अनेक वर्षांनंतर एक अस्सल चित्रपट बघितला. अस्सल हा शब्द अनेक अंगांनी वापरतोय. अस्सल संगीत, अस्सल दिग्दर्शन, अस्सल अभिनय आणी छायांकन.
मला जातीव्यवस्थेवर केलेलं भाष्य (ज्याच्या योग्यायोग्यतेविषयी वेगळी चर्चा होऊ शकते), धुंद झालेली पिढी वगैरे गोष्टींवर बोलायचं नाही. चित्रपटाचा शेवट मला वैयक्तिक लेवल ला रुचला नाही मात्र तो अंगावर येतो हे खरं. अर्थात या गोष्टी हे लेखक दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य आहे. मी याला एक "चित्रपट" म्हणून बघतो. अस्सल ग्रामीण बोली बोटावर मोजाव्या इतक्या चित्रपटात दिसते. आणि चित्रपटाचा बाज इतका ग्रामीण असूनही तो व्यावसायिकरित्या इतका यशस्वी होतोय हि कौतुकाची बाब आहे. याचं कारण हे आहे कि बघणारा प्रत्येक जण यामधल्या पात्रांशी रिलेट करू शकतो. कुणी परश्या, कुणी आर्ची, कुणी सल्या कुणी बाळ्या आयुष्याच्या नाजूक टप्प्यावर झालेले असतात किंवा असे कुणीतरी त्यांना भेटलेले असतात. अभिनयाचे कुठलेही धडे न घेतलेल्या या पोरांकडून इतका अस्सल अभिनय करवून घेतल्याबद्दल नागराज यांना सलाम! कितीतरी दृश्यांमध्ये त्यांचा दिग्दर्शक दिसत राहतो.
अभिनय: ये खूळखुळ्या व्ह भाईर.... आलाय तोंडाला साबण लावून, हू मागं.. सांगीन कि तुला इंग्लीशमदी.... इतका जबरदस्त कडक attitude मी गेल्या दोन हजार अठ्ठावन्न वर्षात बघितलेला नाही. आर्चीला फुटेज जास्त आहे आणि तिने त्याला जस्टीफाय करणे वगैरे च्या फार पलीकडे नेऊन ठेवला आहे. आर्ची चित्रपटाची जान आहे! परश्या इतका निरागस लोभसवाण पात्र सुद्धा अनेक वर्षात चित्रपटात दिसलं नव्हतं. तीच गोष्ट बाळ्या परश्याची. इतका सहज अभिनय कि मोठ मोठ्या नटांनी विचार करावा! मला नकली प्रकारच कुठे आढळला नाही. अय्यो ती आत्या म्हणती तुला म्हणणारी लहानगी, साबण लाऊन लपलं हुतं वाटतं म्हणणारी आर्चीची मैत्रीण, प्रेमपत्र पोहोचवणारं बच्चू, हि सारी पात्र एका जबरदस्त कलाकृतीत देखणे रंग भरतात. या सगळ्यांना प्रत्येकी १०० पैकी २०० मार्क्स!
Cinematography, छायांकन: निव्वळ जबरदस्त! पाखरू जसं आभाळ पांघराया लागतं हे ऐकताना शिवाराच्या वर रात्रीच्या आभाळात उडणाऱ्या पाखरांच्या झुंडी हा एक अजब सुंदर प्रकार आहे. परश्याची एन्ट्री, परश्याची हिरीतली उडी, "भाईर निघ म्हणली" असं म्हटल्यानंतर स्लो मो! एकसो एक सीन आहेत.. मजा आला.
संगीत: काय बोलयचं? मी खूप रात्रीचा शो बघत असल्याने माझ्या मुलाला घेऊन आलो नव्हतो (रातीचा नसता तरी त्याला तीन तास त्याच्या दृष्टीने बिनकामाच्या चित्रपटाला बसवणंसुद्धा चूक झालं असतं म्हणून) नाहीतर झिंग झिंग झिंगाटला आम्ही दोघांनीसुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या असत्या. सांगण्याचा उद्देश हा कि संगीत तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतं आणि वरच्या इतर गोष्टींसोबत तुम्हाला "सैराट" व्हायला भाग पाडतं. याड लागलं हे गाणं आणि त्याचं चित्रण हा मला खूप आवडलेला प्रकार.

तात्पर्य: मुलं बिघडतील, जातीव्यवस्था वगैरे मध्ये जास्त फंदात न पडता एक चित्रपट म्हणून एन्जॉय करा. मुलं बिघडवण्यासाठी सध्याच्या काळात पालकच पुरेसे आहेत. गुगलवर सनी लिओने टाईप केलं कि पुष्कळ असतं. घराघरात टीवी अधून दिसणारे विवाहपूर्व, विवाहबाह्य संबंधावर आधारित मालिका बघण पुष्कळ असतं. याचा रोजचा मारा पुष्कळ असतो. मुलांना योग्य वयात त्या वयाला साजेल अश्या गोष्टींमध्ये आवड निर्माण केल्यास, स्वतःच्या जीवनशैलीला संयमित आणि सरळ ठेवल्यास, मित्रासारखं वागल्यास, शक्यतो मुलं वाया नसतील, टोकाचे निर्णय घेत नसतील असं मला वाटतं. उगा तीन तासांच्या चित्रपटातल्या पात्रांना दोषी ठरवण्यात अर्थ नाही.

मुलांचं असं पळून जाणं, खऱ्या आयुष्याची झळ लागल्यावर बिथरण, प्रियकराचा-नवऱ्याची असुरक्षितता , स्त्रीसुलभ भावनेनं तीने घराला स्थैर्य देण्यासाठी घेतलेले श्रम, ओढाताण-प्रेम या सगळ्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत. मला बऱ्याचश्या भावल्या. पटल्या किंवा नाही हा माझ्या मेंदूचा आणि वैयक्तिक अनुभवाचा मामला आहे. त्यात मी पडत नाहीये.

मला तीन तासाची सैराट सफर आवडली.

© सौमित्र साळुंके (११ मे २०१६)

"निरोप"

आज शिवजयंती.
महिन्याच्या सुरुवातीलाच  ठरवलं होतं कि या हि वेळी रायगडावर जायचंच. पुण्यात असलो तर रजा टाकून जायचं, पण जायचं नक्की.
सारस्वतात असताना शिवजयंती चुकवली नाही. मुंबईहून जमेल तेव्हा महाड गाठायचं, मध्यरात्री तर मध्यरात्री, पहाटे तर पहाटे गडावर जाऊन थोरल्या महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं, गडाच्या रौद्रतेची अनुभूती घ्यायची... इंग्रजांना मनसोक्त शिव्या द्यायच्या... या भूमीला आणि एकंदर आपल्या आयुष्यालाच अस्मितेचा स्पर्श देणाऱ्या संपूर्ण रायगडालाच त्रिवार मुजरा करून पायउतार व्हायचं हा ठरलेला कार्यक्रम...
पण गम्मत पहा..
सात तारखेला माणगावात आलो.  दुर्गाधीराज रायगड इथून सरळ रेषेत मोजाल तर १८ किलोमीटर. एस टी ने एक दीड तासाचा प्रवास... म्हटलं ठीक आहे इथलं काम उरकून आठवड्यात पुण्याला परत जाऊच.
पण असं होत नसतं..
गेले पंधरा दिवस माणगावात मुक्काम ठोकून होतो. दिवस रात्र काम करत होतो... म्हटलं पूर्ण महिनाच इथे जाणार असेल तर एक दिवसाची रजा मागून जाऊन यायचं...
काल २१ तारखेला महत्वाचा निर्णय झाला... २२ ला पुण्याला यायचा.. २२ ला.. २२ लाच! ...
सर्व documents  घेऊन पुणे ऑफिस गाठायचं होतं. must  होतं ... रात्री १२.३० ला आज सकाळच्या ताम्हिणी मार्गे जाणाऱ्या एशियाड चं online बुकिंग केलं.
मात्र त्याचं printouts ? .....?
तीच खरी गम्मत असते... वाईट...
आज सकाळी ९ वाजता मी माणगावच्या एका ऑफसेट दुकानातून प्रिंट आउट घ्यायला गेलो... आणि... दूर डाव्या हाताला दिसला... रविकिरणांच्या अभिषेकात न्हाऊन निघालेला माझा ..... रायगड!...
..... मनाची काही आंदोलनं शब्दात व्यक्त नाहीच करता येत... मी सुद्धा निशब्द होऊन तो परतीचा कागद घेऊन पुण्याला निघालो... ताम्हिणीच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत उजवीकडे दुर्गराजाचे दर्शन होत राहिले.. अक्षरश गलबलून आलं... वाटलं उतरून तडक सुटावं.. पण अगदी समोरच्या कर्तव्यापुढे आत्मसुखाला निरोप द्यावाच लागतो.. हीच तर आमच्या महाराजांची शिकवण होती...
मी सुद्धा निरोप घेतला.. त्याला म्हटलं .... "पुन्हा कधीतरी भेटू"......

@ सौमित्र साळुंके... २२.०३.२०११

'B ' '4 ' U (बाबा, भ्रष्टाचार, ब्रॉडकॅस्टिंग आणि भारत)

Albert Einstein यांनी एकदा गांधीजी यांच्या बद्दल एक विधान केलं होतं, "Generations to come will scarce believe that such a one as this ever in flesh and blood walked upon this earth."

याची आठवण होण्याचं कारण म्हणजे अलीकडे हे जे आंदोलनं, सत्याग्रह, उपोषण वगैरे जे चालू आहे ते पाहून हे गांधीगिरी (?)चे असफल प्रयत्न वाटतात. आता हे वाक्य वाचून कुणाला असंही वाटू शकेल की असतात जगात काही निराशावादी माणसं ज्यांना चांगलं बघवत नाही त्यातलाच हा एक…
परवाची एक गोष्ट… बराच वेळ बस लागली नाही म्हणून शेजारच्या माणसाला विचारल कितीची बस आहे. तो म्हणाला 9.30 ची. वास्तविक 9.40 झाले होते. बरं बस समोर होती, ड्राइवर कंडक्टर समोर होते तरीही… वर तो माणूस म्हणाला, “ तो आतला जो मास्तर आहे ना तो हरामखोर आहे तो मुद्दाम सोडत नाही… वयस्कर आहे नाही तर मुस्काट फोडल असत.. त्याच्या वयाच्या माणसाने त्याला वाजवली की तो जागेवर येईल. मी त्याला म्हटलं त्याला वाजवण्याचा इश्यू आहे का फक्त? काही प्रॉब्लेम नाही… मी वाजवतो, तुम्ही फक्त चार जण सोबत या फक्त शांत उभे राहा काहीच करू नका, मी बघून घेतो … विश्वास ठेवा… टळटळीत उन्हात लोक (किमान 30 जण) त्या मास्तर ला शिव्या घालत उभे राहीले पण जागचा कुणी हलला नाही…मी प्रत्यक्ष जाऊन "वाचून" खात्री केली कि बस ९.४० चीच होती. ४५ ला सुटली FAIR ENOUGH ... हा किस्सा अतिशय प्रातिनिधिक आहे. मुळात आपला समाज विचाराने खूप VIOLENT आहे म्हणून सिनेमात FANTASY एव्हढी चालते पण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी कुल्ल्याला पाय लाऊन पळणारे जास्त आहेत. त्यांना हिरो हवा असतो, आता त्या माणसाला मास्तराच्या कानफटात मारायला (वास्तविक गरज नव्हती!) अण्णा हजारे हवे होते कि बाबा रामदेव? किती वेळ लागतो? चला काका मेमो दाखवा किव्वा SCHEDULE दाखवा मला CONFIRM करायचंय... संपला विषय.. पण नाही बोलबच्चन नाही तर आपल्याला अन्यायाची चीड आहे हे बाजूला उभ्या असलेल्या बायकांना कसं कळणार???

अण्णानवरून आठवलं... तुम्हाला आठवलं तर बघा... “IPL” संपायची वाट बघावी लागली होती त्यांना आंदोलन चालू करायला. देश इथेच गुढग्यावर येतो!.. राष्ट्राच चारित्र्य इथे ठरतं... मी LAW चा विद्यार्थी आहे पण मला कुणाही सुज्ञ मित्राने लोकपाल बिल मला इथे समजावून सांगावं... मला आनंद वाटेल. सत्ताधारी पक्षाशी असं आणि इतकं थेट वैर घेऊन बदल घडत नसतात. बिल पास करून घेणं म्हणजे कंपनीत व्हाऊचर पास करून घेणं नसतं. बरं CONSIDER करणार म्हटलं कि लावलं निम्बूझ तोंडाला .... विजय झाला ... कसला? घंट्याचा?! आपलं फ्रेमवर्क असं आहे कि इथे हुकुमशाही येणं शक्य नाही त्यामुळे खरंच काही चांगले उपाय असतील तर SIT ACROSS THE TABLE, DISCUSS, FORMULATE AND APPLY OR JUST BEGIN.

केंद्राचा कायदा येण्यापूर्वी आपल्या राज्यामध्ये माहिती अधिकार होता. निम्बूझ पिणाऱ्या किती जणांनी खरंच इज्जतीत वापर केला होता त्याचा?? शोक व्यक्त करायला, मेणबत्त्या पेटवायला, मानवी साखळी करायला सगळे पुढे. आम्ही शिपाई पण होणार आणि मुंडकं वर न काढताच गोळ्या सुद्धा मारणार...

रिक्षावाला “नीचे उतरो, नही जायेगा” म्हटला तर शंभरातले ४ जण नडतात, ४६ जण उतरून जातात आणि उरलेले ५० कुणी सपोर्टला येतंय का बघतात. हे प्रमाण ९६: २: २: असेल तर काही आशा आहेत.
आता बाबा रामदेव... काय गरज होती स्त्री चा पेहेराव करायची... घ्या ना करून ARREST. सत्याग्रह आहे ना? एका आठवड्यात आम्लेट? २१ दिवस उपवास करणारा गांधी नावाचा माणूस हटयोगी सुद्धा नव्हता?? पण विल पावर होती. दोन टोले मागून पडले तर योगी व्यक्तीने हे बोलावं कि पुढच्या वेळी सशस्त्र विरोध होईल? खरंच करणार? जमेल? नाही जमणार... पुन्हा रट्टे पडतील. आणि रट्टे हे कधी अण्णा, बाबा यांना पडत नसतात अनुयायांना बसतात. एक योग गुरु गुंडाळायला सिब्बलांना चार दिवस सुद्धा नाही लागले... गुंडाळता आलं हि नसतं जर... उद्दिष्ट पक्कं असतं तर.. म्हटले असते हा धरा बाबांनो मला.. कुठे कुठल्या काळ्या पाण्याची शिक्षा द्यायचीय ती द्या.. पण नाही.. सरळ सलवार कमीझ!

आता या सगळ्यामध्ये एक कॉमन धागा आहे.. मिडिया!!

मला खात्री आहे जर मिडिया चा रोल नसता तर याच्या पैकी एकसुद्धा आंदोलन झालं नसत. सगळ्यांना टेलीविजन वर झळकायला आवडतं... आणि खरचं आवडतं... फक्त कल्पना करा... काही सुद्धा BROADCAST होत नसताना ४२ आणि ४७ यशस्वी झालं. का माहित आहे? सभ्य भाषेत सांगायचं झालं तर अख्ख्या देशाची जळत होती... म्हणून एकजूट झाली होती.

“बदल तेव्हा घडतो जेव्हा जळते...” हात पाय तेव्हा जास्त जोरात मारले जातात जेव्हा पाणी डोक्याच्या वरून जातं. मानवजातीच्या इतिहासातील सर्व महत्वाच्या क्रांतीमधून याचा परिचय जगाला वारंवार आला आहे.

बॉस... आपला देश आहे यार, आपली मातृभुमी आपली आई आहे ... ज्यांना चीथावतो ते बीवीबच्चेवाले आपले बंधू आहेत. एव्हढी जाणीव सुद्धा पुरेशी आहे.

प्रत्येक व्यक्ती ... आणि प्रत्येक व्यक्ती... किमान स्वतःच्या आत्म्याशी जरी प्रामाणिक राहिला तर बाबा नकोत, अण्णा नकोत, मिडिया नको आणि ... गांधी सुद्धा नकोत...

@ सौमित्र २७ जून २०११

Sudhagad Trek... 03/07/2011

Since Kishore informed us that he could not come due to some emergency, our plan for midnight trek suffered its first blow. It was around 11 (02/05/11) in the night when we left Dombivali. At 2 A.M, while we were entering Pali, a group of men with laathis in their hands approached and stopped our vehicle and enquired about us. After successfully convincing them they asked us to close the windows and proceed. As we headed towards Pachhapur, suddenly a Police Petrol Van signaled us to pull over. After the initial Chaukashi, they informed us that there had been instances of frequent robberies there and it would not be safe for us to continue. गाववाले गैरसमजुतीने तरी मारतील किंवा दरोडेखोर तरी लुटतील.....हा हा .. (One amongst the 7 Cops even asked us if we had obtained any Permission to Trek )
Nevertheless, we decided to listen to them. We waited @ Bhakt Niwas No. 2, Pali till 5.30 in the morning. @ 6 we reached the base village Thakurwadi (Other route is from Dhondse Village) and started off @ 6.30 sharp. It was a pleasant early morning trek. Can’t grade it as medium also. An easy trek I’d say. By 9 we were atop Sudhagad. पाउस येत जात होता. पंत सचिव वाडा, भोराई देवी, महादेव मंदिर, तलाव, टकमक टोक, बोलके कडे, महादरवाजा वगैरे पाहून तीन वाजेपर्यंत खाली आलो. Due to fog we could not see Telbaila and Ghanagad but Sarasgad of Pali was very much visible. All in all, a pleasant start for the monsoon, met new friends Girish n Sandip. Driver, Datta too was a nice boy who drove vigilantly throughout the journey. Friends, you enjoy the pics.

~ Saumitra 05072011

कोरीगड ट्रेक (२४ जुलै २०११)

सकाळी ७ च्या शिवनेरीने आदित्य, आतिश, रियांका, रीधीना, कार्तिक, सारिका आणि मी असे लोणावळ्याला निघालो. प्रसन्न ओलाव्याची सकाळ होती. वाशीला दिव्या आम्हाला जॉईन झाली. लोणावळ्याच्या कामत होटेलच्या इथे ड्रायवरला विनंती करून उतरलो. रस्त्याच्या पलीकडेच तीन रिक्षावाले उभे होते. आम्ही एका रिक्षात चार असे दोन रिक्षात आठ जण करून सरळ लोणावळा एसटी डेपो गाठला. एका
रिक्षाचे ६० रुपये म्हणजे ठीकच म्हणायचे.
डेपोच्या जवळ असताना मुसळधार पावसाने हजेरी लावून त्याचा नूर स्पष्ट केला. बरोबर साडे नऊला डेपोत टच झालो आणि शिल्पा-अतुलला कॉल केला. ते डेपोपासून आठ एक किलोमीटरवर होते. पेठ शहापूरला जाणारी बस बरोबर दहा वाजता सुटणार होती. इतक्यात अमेय खोपोलीहून आणि रीधीनाची पुण्याची मैत्रीण मृणालीसुद्धा पोहोचली. मस्तपैकी मुसळधार पाऊस चालू असताना एसटी कॅन्टीन मध्ये गरमागरम वडे (खरं तर चक्क थंड होते) आणि वाफाळलेला चहां (चहा मात्र होता वाफाळलेला) मारून तरतरीत झालो.
 ...दहा वाजल्यापासून एसटी मधल्या पब्लिकने स्वत:च बेल मारणं चालू केलं आणि आम्ही अस्वस्थ झालो कारण शिल्पा-अतुल जवळपास पोहोचले होते मात्र डेपोत आले नव्हते. अतुल म्हणाला आम्ही एसटीतून खाली उतरून चालत येतोय कारण ट्राफिक खूप आहे (शिल्पा-अतुल ठाणे-वंदनाहून थेट लोणावळ्याला येणाऱ्या एसटीने आले होते). शेवटी आम्ही ठरवलं कि सगळ्यांना पुढे पाठवायचं आणि मी दोघांसोबत मागाहून यायचं (कसं यायचं याचा कुठलाही प्लान नव्हता :-)]
...ड्रायवरने गाडी चालू केली आणि शिल्पा अतुल डेपोमध्ये आले. मी हात दाखवूनसुद्धा त्याने गाडी थांबवली नाही. मात्र अतुल म्हणाला कि ट्राफिकमध्ये बस अडकणार नक्की तेव्हा आम्ही तिघेसुद्धा मस्तपैकी १०० मीटरची दौड मारून बस पकडली... हुशशss!... सुदैवाने सगळे एकत्र झालो...
साधारण तासाभरात आम्ही पेठ शहापूर या पायथ्याच्या गावी येऊन पोहोचलो. (पेठच्यापुढे आंबवणे या गावातूनहि एक वाट कोरीगडावर येते मात्र ती थोडी कठीण आहे). समोर दिसणाऱ्या tower च्या बाजूने वर जाणारी वाट धरून आम्ही ट्रेक चालू केला. मग अतिशय सोप्या अश्या वाटेने वाटभर धम्माल करत, हास्य विनोद करत; मात्र अतिशय काळजीपूर्वक आणि एकमेकांकडे पूर्ण लक्ष ठेवत आम्ही चालत होतो. एकासुद्धा क्षणासाठी कुणीही नजरेच्या टप्प्याबाहेर जाणार नाही याची सर्वानीच काळजी घेतली. ट्रेकच्या बाबतीत मला आवडणारी गोष्ट म्हणजे इथे कुणावर कुरघोडी करायची नसते, एकत्र मार्गक्रमणा करायची असते आणि समूहातल्या सर्वात कमी वेगवान व्यक्तीचा वेग हाच संपूर्ण समूहाने ठेवावा लागतो...
मला वाटतं दोन एक तासात आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. वाटेत आम्हाला बुरुज आणि एक गुहासुद्धा दिसली. वाटेत एक कातळात कोरलेला आडोसा दिसला तेव्हा आदित्यने सहज आपलं “इथे पहारेकरी लपायचे” असं विधान केलं आणि त्यावर विनोद करायला पुढचे २० मिनिट कमी पडले.. पहारेकरी होते तर ते लपायचे का?, शत्रू निघून गेल्यावर मग लपलेले पहारेकरी समोरच्या स्वीम्मिंग पूल मध्ये (म्हणजे डबक्यात) पोहत सुद्धा असतील.. हाच इतिहास सांगू येणाऱ्या पिढीला म्हणजे शूरवीर होतील वगैरे वगैरे असे उच्च बुद्ध्यांकाचे आमचे विनोद चालू होते...
हो.. एक अतिशय स्वच्छ पाण्याच टाकं सुद्धा त्या कातळात होतं.. खूप स्वच्छ आणि सुरक्षित.
आम्ही माथ्यावर पोहोचताच अतिशय जोरदार वारा सुटला आणि आम्ही दोन्ही हात फैलावून त्याचा स्वीकार केला.. (आदित्यचा प्रातिनिधिक फोटो पहा).. त्यातच माझी टोपी उडून महादेवाच्या मंदिरामागच्या तळ्यात जाऊन पडली.. आणि पुन्हा एक चान्स मिळाला सगळ्यांना दात काढायला..  अमेयने स्वतःचा प्राण पणाला लावून (असं लिहिताना लिहायचं असतं; थोडं इंटरेस्टिंग वाटतं) मला कॅप आणून दिली.. [खरं तर त्या कॅप ने नक्की माझी काय मदत केली हा प्रश्न अजून मला पडलाय??? कारण माझं डोकं चिंब ओलं झालच होतं...]
अतिशय दाट धुक्यात आम्ही चालत होतो.. मधेच धुक्याची दुलई काही क्षणाकरता दूर झाली आणि दोन्ही मोठ्ठाली तळी नजरेस पडली.. लय भारी..
पुढे कोराईदेवी (गडाची अधिष्ठात्री देवी) च्या मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा पाहिलं कि मंदिरात सुद्धा बरेचसे लोक आधी पासून होते आणि मंदिराच्या तीनही बाजूंना छपराच्या आडोश्याला कितीतरी ... खरंच कितीतरी लोक उभे होते... झाले का वांधे... दर्शन हि नाही आडोशाला जेवण हि नाही.. अर्रे असे वांधे होत रहातात... मग आमच्या टीम ने एक ऐतिहासिक निर्णय घेतला... आम्ही चक्क एक वर्तुळ करून भर पावसात उभे राहिलो.. आणि रीयंका ने तिने घरून आणलेला खाऊचा अक्षरश: खजिना बाहेर काढाला... ब्रेड ओम्लेट (खूप सारे ब्रेड ओम्लेट), मिनी समोसा, bread pattice (खूप सारे bread pattice), कार्तिक ने आणलेले केळीचे वेफर्स, दिव्या ने आणलेल्या खूप साऱ्या इडली आणि
चटणी यांवर अक्षरशः तुटून म्हणजे तुटून पडलो.. अहाहा... काय मजा येते.. Imagine करा... सर्कल मध्ये उभ राहून, पाऊस चालू असताना जेवायच... दोस्त लोग... ट्रेक बहोत कुछ सिखाता है... दोस्तीयारी भी और समझदारी भी... (हा माझा डायलॉग आहे.. स्वत:चा)
 ...असो, पोटपूजा झाल्यावर मला सगळ्यांना गडावरची सर्वात मोठी तोफ.. “लक्ष्मी” दाखवायची होती. देवीच्या मंदिरापाशी असताना मला ती धुक्यात पुसटशी दिसली होती. मात्र जेवण होईतो पुन्हा धुके गडद झाले आणि तोफेच्या दिशेने जाताना भलत्याच वाटेवर गेलो. डोक्यातलं नेव्हिगेशन पुन्हा ट्राय करायचं ठरवून एका दिशेने चालत गेलो आणि आम्हाला लक्ष्मीचे दर्शन झाले. आणि आम्ही भरून पावलो. (A Sincere Note: there are total six cannons on the fort, Laxmi being the biggest of all. But honestly I still have li’l suspicion whether the big cannon we spotted was Laxmi as we could not locate all the six cannons atop fort. So at least for ascertaining Laxmi please do not rely on this article).
बाकी गडावर आजूबाजूला बरेचसे अवशेष इतिहासाची साक्ष देताना दिसतच होते. १६५७ च्या सुमारास स्वराज्यात दाखल झालेला हा गड १८१८ च्या मार्च महिन्यात तीन दिवसांची निकराची झुंज देऊन शेवटी कर्नल प्राथरच्या हाती लागला. त्यासाठी त्याला दारूकोठारावर मारा करावा लागला होता. लढाईनंतर कोराई देवीचे सारे दाग दागिने लुटून नेण्यात आले होते. आज दिनी हे सर्व दागिने मुंबईच्या मुंबादेविच्या अंगावर आहेत.
बाकी इतर ऋतूत दिसणारे कर्णाळा, माणिकगड, तोरणा, प्रबळगड, माथेरान तसेच मुळशीचा अथांग जलाशय मात्र सभोवतालच्या अतिशय दाट धुक्यामुळे दिसले नाहीत. अधेमध्ये गडाच्या संरक्षक भिंतीपाशी गेल्यावर सहारा अ‍ॅम्बी व्हॅलीचे दर्शन होत होते. गडाच्या maintenance चे श्रेय मात्र सहाराला द्यावे लागेल. उचलून stand ठेवलेल्या तोफा, गडाच्या दिशेने केलेली रोषणाई, पायऱ्या यामुळे गड सहज, सोपा आणि सुंदर वाटतो. लोणावळ्यात कुटुंबासहित भुशी धरणावर किंवा पिकनिक point ला जाण्यापेक्षा हा अनुभव कधीही अधिक अविस्मरणीय असेल.
अश्या तऱ्हेने गड मनसोक्त बघितल्या नंतर आम्ही पुन्हा एकदा छान गंमतीजमती करत पायथ्याशी येऊन पोहोचलो. दुपारी साडे तीन वाजता पेठ शहापूर गावातून एसटी लोणावळ्याला जाते शक्यतो तीच गाठावी म्हणजे लोकल तरकारीच्या गाड्या वगैरेचा त्रास वाचू शकेल. त्रास त्या गाड्यांचा नसतो त्या ठरवताना कराव्या लागणाऱ्या घासाघीशीचा आणि काही लोकांच्या काही विशिष्ट प्रकारच्या वर्तणुकीचा, फसवाफसवीचा होऊ शकतो. उत्तम म्हणजे कुटुंबासोबत येणार असाल तर स्वत:चे वाहन किंवा खासगी टुरिस्ट गाडी करूनच यावे. आम्ही सर्व तरुण मंडळी असल्यामुळे आम्ही साडे तीनची गाडी जाऊ दिली आणि थोडं उशिरा पायउतार झालो. किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी आल्यावर एक वाट सहारा सिटीमध्ये जाते ती टाळावी आल्या मार्गे परत जावे म्हणजे कुणी हटकण्याचा प्रश्न येणार नाही.
शेवटी एका तरकारी स्टाईल गाडीने आम्ही लोणावळ्याला पोहोचलो... पण मजा आली... बऱ्यापैकी ओपन असल्याने भन्नाट वाऱ्याचा आनंद घेता आला. लोणावळ्यात पोहोचताच मृणालीला निगडीला जाणारी बस मिळाली. मात्र मुंबईला जाणाऱ्या गाड्याच येत नव्हत्या.
ज्या आल्या त्या भरभरून आल्या. सुदैवाने बऱ्याच उशिरा एक Tourist Tavera मिळाली आणि आम्ही रात्री उशिरा दादरकडे रवाना झालो. अमेय लोकल बसने तासाभरात खोपोलीला पोहोचला सुद्धा.
सर्वांना see you म्हणून मी दादरहून कॅब केली तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते. वातावरणात गारवा आणि निरव शांतता... वाटेवर असतानाच सर्वांचेच मेसेज येऊ लागले... next is what? खूप छान वाटलं.
नवा मार्ग, नवा डोंगर, नवे मित्र, नवा प्रवास, आणि मात्र घराकडे परतताना येणारी जुनीच feeling... बांद्रा ब्रीजला उजवा वळसा घेताना उगाचच कुठून कसं पण ब्रायन अडम्स चं गाणं मनावर रुंजी घालू लागलं..
c'mon c'mon c'mon - we're gonna make it home tonight
c'mon c'mon c'mon - everything's gonna be alright
the nite is alive - the world is asleep
dreaming of promises they can't keep
we gotta be tough we gotta be strong
it's only love we've been waiting on...

सप्रेम,
सौमित्र
२७.०७.२०११

पाऊस वेंधळा

पाऊस वेंधळा पुन्हा नव्याने आवेगाने येतो
नव्या सरींनी तिच्या सयींचे जुनेच गाणे गातो...
पाऊस वेंधळा भल्या सकाळी धसमुसळासा दिसतो
अन योग्यासम संध्याकाळी ध्यान लाऊनि असतो...
पाऊस वेंधळा कधी तिच्या मग डोळ्यामधला विरह वाचतो
तिच्या अंगणी तुळशीपाशी डोह साचतो...
पाऊस वेंधळा नको वाटतो अंधारातून...अंधाराचा...
उदास निश्चल अगतिक चेहरा या दाराचा...
पाऊस वेंधळा तरी कश्याने मित्र वाटतो?
तो जाताना का डोळाभर मेघ दाटतो...
पाऊस वेंधळा.... अन माझ्याही अश्या मनस्वी ओळी
तो गेला कि रिते रिते नभ अन रीतीच माझी झोळी...
@ सौमित्र साळुंके
१३ ऑगस्ट २०११

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे रान घनदाट...
आयुष्य कधी चुकलेली वाट
आयुष्य कधी दिशेचे बाण...
आयुष्य कधी कंठाशी प्राण
आयुष्य कधी अनामिक भीती,
आयुष्य चक्क भीतीवरची प्रीती
आयुष्य कधी खिळखिळी शिडी...
कधी अरुंद मार्ग...
आयुष्य म्हणजे गडकोटांचे जगणे...
आणि गडकोट म्हणजे स्वर्ग...
सौमित्र साळुंके
१४ ऑगस्ट २०११

भीमाशंकर ट्रेक: शिडी घाट मार्गे २०.०८.२०११

भीमाशंकर

तालुका: आंबेगाव

जिल्हा: पुणे

समुद्रसपाटीपासून
उंची: साधारण ३२०० फूट.

गेल्या रविवारी सगुणा बाग करून १५ ऑगस्ट ला सकाळी निघायचा मुख्य प्लान होता जो काही कारणास्तव पुढे ढकलला गेला आणि या रविवारी तो पूर्ण करायचा असं ठरवलं. १९ ला दादरहून रात्री शेवटची कर्जत लोकल (१२.५५ दादर ला) पकडून मी आणि आतिश कर्जतला निघालो. आम्हाला किशोर, घाटकोपरला आणि मानस अंबरनाथ ला जॉईन झाले. किशोर स्वतः भीमाशंकरला याआधी सात आठ वेळा जाऊन आला आहे. हा ट्रेक शिडी घाटातून असल्याने आणि मॉन्सूनमधे असल्याने मला त्यातल्या संभाव्य धोक्याची कल्पना होतीच. आम्ही तिघांनी किशोर कडूनbकाही महत्वाची माहिती विचारून घेतली.

रात्री साडे तीन वाजता आम्ही कर्जतला पोहोचलो. बाजूच्या बस डेपोत जाऊन पाहिलं तर आधीच एक दोन ग्रुप तिथे होते. आमच्या पाशी दोन पर्याय होते. १. सकाळी बस येई पर्यंत किंवा बस पूर्ण भरेल इतके लोक येईपर्यंत थांबणे ऑर एल्स जवळ उभ्या असलेल्या टमटम वाल्याला थोडसं कन्विन्स करणं. मी दुसऱ्या एका ग्रुप ला लवकर जाण्याचे फायदे एक्स्प्लेन केले आणि आमच्या सोबत चला म्हटलं. दुसरा प्लान यशस्वी झाला. पर हेड ७० रुपये घेऊन साहेब आम्हाला पहाटे ६ वाजता खांडस ला घेऊन आले. जराही वेळ न् दवडता आम्ही ट्रेक बेसला अर्ध्या तासात हजर झालो. तिथे थोडसं फ्रेश होऊन बरोबर सात वाजता आम्ही शिडी घाटाकडे कुच केलं. बेस पासून विचार करता भीमाशंकर चे दोन टप्पे आहेत. शिडी घाट हा त्या पहिल्याच टप्प्यात लागतो. दगडावर आणि करकचून बांधलेल्या दोरावर लोखंडी शिडीची
मुख्य मदार आहे. पावसाळ्यात निसरडे झालेले आणि सरळ दरीत डोकावणारे तीन चार भितीदायक टप्पे आम्ही शांतचित्ताने आणि एकाग्रतेने एकमेकांना गाईड करत पर केले आणि पहिला टप्पा ओलांडला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जंगलच जंगल. दुसऱ्या टप्प्यात जिथे शिडी घाट आणि गणेश घाट मिळतात तिथून आम्हाला इतर ट्रेकर्स आणि काही शिवभक्त भेटू लागले. बरोबर पावणे अकरा वाजता आम्ही माथ्याशी पोहोचलो. तडक मंदिर गाठले, गर्दी खूप असल्याने खूप लांबून, मंदिराच्या बाहेरूनच महादेवाचे दर्शन घेतले. आम्हाला शिडी घाटातून सुखरूप वर येऊ दिलं म्हणून धन्यवाद म्हटलं. आणि पासाचे वीस तीस रुपये देऊन परमेश्वरासोबत मांडवली करायचा आणि ताटकळत उभ्या असलेल्या भक्तांच्या श्रद्धेचा अपमान करण्याचा आम्हा चौघांचा पिंड नसल्याने आम्ही शिव शम्भोला जेव्हा एकटा असशील तेव्हा ऑफ डे ला पुन्हा भेटू असं बाहेरूनच सांगितल आणि पोटोबाला खुश करायला निघालो, आडवा हात मारला आणि नागफणी कडे निघालो. अर्धा तास खडी चढून एका माथ्यावर पोहोचलो तेव्हा लक्षात आलं कि हि नागफणी नव्हे... हे हे :-D

मग ठीक दीड वाजता आम्ही सरळ खालचा रस्ता धरला अधे मध्ये मस्त धुक्यात चहा मारत आणि येताना गणेश घाट मार्गे, पदर गडाचे जवळून दर्शन घेत बेस च्या ठिकाणी नमके पाच वाजता पोहोचलो. पुन्हा थोडे फ्रेश होऊन नेरळ ला जाणारे कुणी टमटम पार्टनर्स येतायत का ते पाहत बसलो. सहा एक जणांचा एक अतिशहाणा आणि उद्धट लीडर असलेला ग्रुप आला ज्याने टमटमवाल्यांना सरळ शुद्ध भाषेत फाट्यावर मारलं आणि नेरळचं साठ जास्त होतात; आम्ही बारा वर्ष इथे येतोय असं सांगत FASHION STREET वर दुकानदाराचा भाव न् पटल्याच्या थाटात पुढे निघून गेला. मी अक्षरश: हतबद्ध झालो!... माझ्या मनात जो विचार आला तो रिक्षावाल्याने बोलून दाखवला... “आता या पोरास्नी कुनीबी घेऊन नाय जाणार पुढं कुठली गाडीच नही हो सायेब...” असो, आम्ही लोकल्स शी जसं बोलयला हवं त्या आदराने
बोललो आणि त्याचा परिणाम म्हणून... आम्ही चक्क मारुती ओम्नी मधून नेरळ ला निघालो. बऱ्याच पुढे एका “फाट्यावर” आम्हाला तो ग्रुप गावातून गाडी न् मिळाल्याने फरफटत चाललेला दिसला.... बिचारे आणि उद्धट!

गंमत म्हणजे सगुणा बागेतून येताना मिळालेली ६.५५ चीच CST मिळाली आणि आम्ही मुंबई मेरी जान म्हणत आत घुसलो....

काही निरीक्षण:

१. इतर ठिकाण प्रमाणे इथे येणारे भक्तगण सुद्धा प्रचंड प्रमाणात गलिच्छ वागतात.. खाण्याचे पदार्थ तसेच त्याची वेष्टने इतस्तत फेकतात. मला खात्री आहे स्वत:च्या घरात तो प्रकार कुणी करणार नाही.
२. एके ठिकाणी एका बाईक वरून जाणाऱ्या कपल वर आमच्या नजरेसमोर माकडांनी हल्ला बोल करत त्या महिलेच्या हातातली पर्स ओढली, झिप उघडली, त्यातला एक डबा काढून घेतला आणि नंतर सुद्धा तिच्या हातात आणखी काही आहे का हे पाहू लागले. आम्ही काठ्या कुठ्या उचलून त्यांना आरडा ओरडा करून घाबरवले तेव्हा ते बाजूच्या जंगलात पसार झाले.... मात्र डबा घेऊनच!.. याचा अर्थ एकच... यापूर्वी इथे येणाऱ्या लोकांनी अतिशहाणपणा करून या माकडांना खाऊ घातला आहे.. त्याची त्यांना सवय झाली आहे...इतकी कि त्यांना पर्स उघडावी कशी आणि नेमकं कशात खाऊ असतो हे हि माहित झालं आहे... हे कारण झालं आता पर्याय. शक्यतो पाठीवरची पिशवी आणावी आणि हातात एक चांगलीशी काठी असावी. सोप्प.
३. चांगल्यापैकी गिरीभ्रमणाचा सराव असल्याखेरीज शिडी घाटाने जाऊ नये, पावसाळ्यात बिलकुल जाऊ नये. गणेश घाट सुद्धा नितांत सुंदर आणि सहज आहे.
४. भीमाशंकर हे जसं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्याच प्रमाणे हे एक अतिशय जैववैविध्य असलेल अभयारण्य/ जंगल सुद्धा आहे याच भान शिवभक्तांनी राखणं आवश्यक आहे. मोठ्ठ्या आवाजात मोबाईल वर “बेदर्दी राजा” आणि तत्सम गाणी लाऊन आम्हाला “जय भोलेनाथ” असं म्हणणारे दळभद्री लोक सुद्धा भेटले. त्यांच्या जय भोलेनाथ ला मी बम बम भोले ऐवजी कोऱ्या चेहऱ्याने रिप्लाय देत होतो. किशोर ने एक सुंदर वाक्य सांगितलं, “ तुम्ही जंगल बघू शकाल कि नाही माहित नही पण जंगल तुम्हाला बघतचं असतं.. व्वा!
५. नेहमी प्रमाणे पुन्हा त्याच CONCLUSION  वर आम्ही आली. फुकट आणि सहज ACCESSIBLE असलेल्या ठिकाणांची लोक नासधूस करतात... करतातच.
... असो... जय भोलेनाथ!

सगुणा बाग (निसर्ग निकेतन) १५ ऑगस्ट २०११

ट्रेकला जायचं म्हणजे शांत चित्त, निसर्गाच भान, गप्पा टप्पा आणि मोठमोठ्याने हसण्या खिदळण्यावर नियंत्रण. त्याच करता थोडी विश्रांती आणि गप्पा टप्पा करता याव्यात म्हणून नेरळच्या सगुणा बागेत जायचा निर्णय आम्ही घेतला.

नेरळ रेल्वे स्टेशनच्या जवळच श्री. भडसावळे यांचं हे साधारण ५० एकरभर पसरलेलं हे फार्म आहे. आम्ही दादरहून सकाळी ७.०३ ची कर्जतला जाणारी ट्रेन पकडली आणि ८.३० ला नेरळला पोहोचलो. PICK UP स्पॉट शोधताना गडबड झाली, इकडे तिकडे फिरण झालं पण सांगितल्याप्रमाणे त्यांची PICK UP VEHICLE आली होती आणि आम्ही (आदित्य, आतिश, रीयांका, उपेना, दिव्या, मानसी, फोरम, स्नेहल आणि मी) सगुणा बागेकडे निघालो. आम्ही तिथे पोहोचताच चौकहून निघालेला अमेयसुद्धा त्याच्या बाईक वर तिथे पोहोचला. आणि आमची छोट्याश्या, कंट्रोल्ड मात्र सुरक्षित आणि सुंदर वातावरणात भ्रमंती चालू झाली.

बागेतच सकाळची पोटभर न्याहारी केल्यावर आम्ही “रमेश” गाईड सोबत भ्रमणाला निघालो. रमेशने आम्हाला सुरुवातीला वेगवेगळया वनस्पती आणि वृक्षांची ओळख करून दिली, त्यांची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. पुढे गांडूळखत बनविण्याची प्रक्रिया आणि ठिकाण दाखवलं जे खरंच स्वागतार्ह असं आहे. आजही आपल्या देशात शेती हाच बहुतांश जनतेचा मुख्य व्यवसाय आहे, शेती आणि शेतीसंलग्न व्यवसाय हेच आजही देशातले सर्वात मोठे आर्थिक क्षेत्र आहे. Samuel Johnson यांच एक अतिशय मार्मिक वाक्य आहे. “Agicuture not only givs riches to a nation, but the only riches she can call her own”. हे एक त्रिकालबाधित सत्य आहे. शेती, संरक्षण आणि अर्थ हे राष्ट्राच्या स्वावलंबनाची प्रतीके आहेत.

पुढे आम्ही गाईच्या गोठ्याला, छोट्याश्या मत्स्यालयाला भेट दिली. वाटेत सुंदरशी बदके तळ्यात विहार करताना दिसली. मत्स्यालयातल्या छोटेखानी जिम मध्ये आदी आणि अमेय ने फोटोपुरता का होईना व्यायाम केला. त्या तिथेच दिव्याचा एक “जादू” भरा फोटो आम्ही काढला. :-D

त्यानंतर आम्ही सारे निघालो “बफेलो राईड” ला. सागर... म्हणजे रेडा जसा पाण्यात उतरला आणि मी त्याच्या पाठीवर घोड्यावर बसल्यासारखा बसलो... नंतर आदित्य चक्क अश्या स्टाईल मध्ये बसला कि अमेय ने त्याला विचारल कि रेड्यावर बसलायस कि हायाबुसा
चालवतोयस? पुढे आतिश ने तर कहर केला... अक्षरश: त्याच्या पाठीवर असा आडवा झालं कि मला वाटलं कि बुडणार आता सागर... फोटो बघा आणि अनुभव घ्या!!!

नंतर खरी धमाल आमची वाट बघत होती.... सुरुवातीला काही कारणामुळे धबधब्यावर जाण्यास स्पष्ट नकार मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तींशी थोडा प्रेमळ संवाद साधला, अडचण समजून घेतली आणि धबधब्यावर जाण्यासाठी गाडी आली. मस्तपैकी अस्सल कोकमाचा सरबत पिऊन आम्ही माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्याकडे निघालो. इथे मात्र बॉस खूप जास्त धम्माल आली. थोडसं ट्रेकिंग झालंच आणि धबधब्यावर पोहोचल्यावर जी काही धमाल आम्ही केली ती लिहिण्यापेक्षा फोटोत स्पष्ट लक्षात येते... उंचावरून येणारा
पाण्याचा लोट... निसर्गाचा फक्त एक लहानसा एलिमेंट आणि त्याच्या खाली आम्ही एव्हढे सारे पण सगळे खुजे त्याच्या आव्वाक्याने इम्प्रेस्ड!... honoured खरं तर. शरीर अक्षरश: शेकून लाल करण्याची ताकद त्यात होती. मुसळधार पाऊस जर पडला असता तर मी
त्याच्या ५० फुटांवर सुद्धा कुणाला जाऊ दिलं नसतं. पण तुलनेने हा खुपच सेफ स्पॉट होता.
तिथून आम्ही पुन्हा बागेत आलो. एव्हाना सडकून भूक लागली होती... बाजूला स्नेक शो चालू असताना आम्ही सगळ्यांनी आमचा स्वत:चा “Snack Show” चालू केला. (मला माहित आहे कि हा अत्यंत वाईट विनोद आहे मात्र याच्याही पेक्षा खतरनाक खतरनाक, वाईट हून वाईट आणि विजेत्याचं पारितोषिक विभागून द्यावं असे विनोद आदित्य आणि अमेय दिवसभर करत होते... त्याबाबतीत तर माझा फक्त गेस्ट अपिअरंस होता)

जेवण झाल्यावर आम्ही मस्त टंगळ मंगळ करत जवळच्या तलावापाशी आलो. आणि मस्त पैकी बोटिंग केलं. मी आणि आदी ने त्यातल्या त्यात बैलगाडीत बसायचा जास्त आनंद घेतला. त्यानंतर काही जण मासेमारी करू लागले... फोरम तर त्यात एव्हढी घुसली होती कि
रमेशला वाटलं आज बहुतेक तळ्यातले सगळे मासे संपणार... चला चला झालं झालं असं त्याने इशाराच देऊन टाकला. J बिचारा.. हा हा !!

मग तिथून आम्ही मुख्य ठिकाणी येऊन आवरा आवर करू लागलो. दिवसभर सुट्टी देऊन देऊन टाकलेले मोबाईल बाहेर काढले. एक छानसा agro-tourism चा अनुभव घेऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी गाडीत येऊन बसलो. अमेय त्याच्या बाईकवर पुन्हा स्वार झाला.
एक अतिशय निवांत असा दिवस जगून, फ्रेश होऊन पुन्हा एकदा वाटभर हसत खिदळत आम्ही स्टेशनला निघालो. ६.५५ ची CST ची मस्त ट्रेन मिळाली आणि सगळे पक्षी आपापल्या घरट्याकडे निघाले....

टीप: लोणावळा –माथेरान – माळशेज सारख्या निसर्गरम्य देखण्या ठिकाणांची सवंग प्रवृत्तीच्या लोकांनी आणलेली अवकळा पहाता, थोडसं खर्चिक जरी वाटलं तरी एका अतिशय सुरक्षित कौटुंबिक सहलीसाठी सगुणा बाग अतिशय सुरेख ठिकाण आहे. इथे स्टे सुद्धा करण्याचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. पाऊस असताना आणि एरव्ही हि सहकुटुंब धबधब्यावर जाणे टाळावे. कारण हा धबधबा सगुणा बागेचा भाग नसून माथेरानचा भाग आहे आणि माळशेज – लोणावळा इथे आढळणारे बीभत्स प्राणी इथेही आढळतात.

सौमित्र साळुंके
(२१.०८.२०११)

किल्ले राजमाची – दिनांक ६ ऑक्टोबर २०११, विजयादशमी.

सीमोल्लंघन म्हणजे काय तर सीमा लांघने, चौकटी मोडणे... पायातले जड जोखड झुगारून देणे. नव्या क्षितिजाचा धांडोळा घेणे, स्वत:च्या क्षमतेचा अंदाज घेणे.
....
चार दिवसांपासून आतीशची तब्येत ठीक नसल्याने जावं कि न् जावं या विचारात असताना ५ तारखेच्या रात्री आतिशला जरा आराम पडला मात्र त्याला सक्तीची विश्रांती सांगितल्याने, मी आणि सतीशने एलेवंथ अवरला दोघांनीच राजमाची गाठण्याचा निर्णय घेतला. ५ च्या मध्यरात्री मुंबई - भोर आवडता ‘लाल डब्बा’ दादर इस्टला पकडला. सतीशला जागा मिळाली आणि त्याची दाढ दुखत असल्याने तो पेनकिलर घेऊन निद्रिस्त झाला. मी मध्ये मध्ये उभा राहात, मध्ये मध्ये तिसरी सीट घेत होतो. एकदाचे ३ वाजता लोणावळा डेपोत पोहोचलो.
घाईघाईत आल्याने torch विसरलो होतो त्यामुळे ४.३० ला चालू लागण्याचा प्लान फसला. ६ वाजता थोडं उजाडल्यावर राजमाचीच्या दिशेने
निघालो. लोणावळ्याच्या उत्तरेलाच पण किंचितसा पश्चिमेला राजमाची वसला आहे. राजमाचीवर श्रीवर्धन आणि मनरंजन असे दोन दुर्ग आहेत. लोणावळा ते राजमाची हि वाट जवळजवळ २२ किलोमीटरची आहे, त्यात पुन्हा हे दोन दुर्ग आणि उतरताना राजमाचीच्या
उत्तर- पश्चिमेकडून कोंदिवडे गावात खोल उतरायचं म्हणजे पाय गळ्यात घेण्याचा प्रकार होता.

२२ किलोमीटर ची वाट तुडवत आणि सह्याद्रीच्या भव्यतेची अनुभूती घेत साडे दहा वाजता ‘उधेवाडी’ या पायथ्याच्या गावी पोहोचलो. तिथे एका सद्गृहस्थाच्या घरी थोडीशी पोटपूजा केल्यावर आम्ही श्रीवर्धनच्या वर पोहोचलो. बरोब्बर १२ वाजता आम्ही माथ्यावर होतो आणि चटके खात किल्ल्याचा परिसर पाहिला. पुन्हा उधेवाडी मध्ये वेगात पायउतार झालो. दसऱ्याच्या पूजेकरता मुंबईत ६-७ पर्यंत पोहोचायचे असल्याने ‘मनरंजन’ चा मोह आवरता घ्यावा लागला आणि साधारण एक वाजता राजमाचीच्या डाव्या अंगावरून उतरू लागलो.

हि जी वाट आहे ती दाट जंगलातून जाते (इथे याच वाटेवर थोडी वाट वाकडी केल्यास “कोंडणे गुंफा” गाठता येतात). इथे आम्हाला कंपास चा अतिशय अतिशय जास्त उपयोग झाला. जिथे दोन चार वाट दिसत होत्या तिथे केवळ कंपास मुळे खालची वस्ती लोकेट करणं शक्य झालं आणि एकाही वाट न् चुकता आम्ही खाली ‘मुंढेवाडी’ या वस्तीत बरोब्बर दीड तासात पोहोचलो. हा खरंच खूप चांगला वेग आहे. तिथून मग रणरणत्या उन्हात एक तास पायपीट करून ‘कोंदिवडे’ गावात पोहोचलो. आणि थोडीशी चलाखी वापरून १०० रुपयात दोघे कर्जतला
पोहोचू अशी व्यवस्था केली. टमटमवाला सुद्धा तसा समजूतदार होता. दिवसभरात एकंदर किमान ३०-३५ किलोमीटरची पायपीट करून शेवटी एकदाचे कर्जतला पोहोचलो आणि ४.२० ची छत्रपती शिवाजी टर्मिनस पकडून हर हर महादेव म्हणत मुंबईकडे रवाना झालो.

... एक सीमोल्लंघन जाहले.

काही महत्वाच्या नोंदी आणि निरीक्षण:

१.     लोणावळा राजमाची वाटेवर एक वाट धाक बहिरीस जाते

२.     इथे एखादा संध्याकाळी उधेवाडीस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे दोनही दुर्ग निवांत पाहून पुन्हा राजमाची लोणावळा वाटेनेच मुंबईस परतणे जास्त “सोयीस्कर”. अर्थात हे कुटुंब – परिवारच्या दृष्टीकोनातून सांगतोय.

३.     जर राजमाचीच्या डावीकडून कोंदिवडे इथे उतरायचे असल्यास कंपास हवीच. किंवा दिशांचा खूप चांगला अंदाज आणि अभ्यास हवा.

४.     राजमाचीच्या उजवीकडच्या दरीमध्ये “उल्हास” नदीचा उगम होतो. ती दारी पाहणे निव्वळ थ्रील आहे.

~ सौमित्र साळुंके (०८.१०.२०११)

फेसबुक - Facebook

आजकाल सगळे फेसबुकवर असतात.
आमच्या आण्णांना फेसबुक म्हणजे काय हे समजावताना माझ्या तोंडाला फेस आला होता.
असाच फेस इंटरनेट म्हणजे काय हेसमजावतानाहि आला होता.
कुठल्यातरी वर्तमानपत्रात वाचून त्यांनी मला इंटरफेस म्हणजे काय असं विचारलं तेव्हा माझा फेस बघण्यासारखा झाला होता.
कारण मलाच ते कायअसतं ते माहित नाही.
आमच्या शेजारच्या काकूंना असे वाटते कि सर्फपेक्षा टाईडचा फेस जास्त असतो.
एरव्हीही काकुंची मतं सर्वांना बिनविरोध फेस करावी लागतात.
कारण काकूंना फेस करण्यापेक्षा त्यांची मतं फेस करणं तुलनेने सोपंच असतं.
फेशिअल म्हणजे नक्की काय हे मला माहित नाही पण काकूंची मुलगी महिन्यातून पंधरावेळा तरी ते करते.
ती रोजच चेहऱ्याला काहीतरी फेसून असते.
ती ज्या ब्युटी पार्लर मध्येजाते त्याच नाव मला आवडत नाही. “ फे  वे  ”.
नाक्यावरच्या कुठल्यातरी टवाळ मुलाने ‘फे’ वरचा मात्रा काढून टाकला होता.
कितीतरी दिवस दुकानावरचं “   वे  ” वाचून गिऱ्हाईक परत जात होतं.
अं... सॉरी, मी फेसबुकबद्दल सांगत होतो. हे असंच होतं...
फेसबुकमुळे चटकन चित्त विचलित होऊ लागलं आहे.
त्यामुळे आजकाल कशातच लक्ष लागत नाही.
स्टार प्रवाहवरलक्ष्य लक्ष्य नावाची मालिका लागते.
खरतर एकदाच लक्ष्य आहे पण ते दोनदा लक्ष्य लक्ष्य असं म्हणतात म्हणून मीही तसं म्हणतो.
मी लक्ष्य, लक्ष देऊन बघतो.
लक्ष्य गुन्हेगारीमालिका आहे.
म्हणजे खरं तर पोलिसांची मालिका आहे.
ते गुन्हेगार पकडतात.
आणि ते त्यांना सापडतात.
मलासुद्धा लहानपणी पोलीस व्हायचं होतं.
म्हणजे मला मोठेपणीच पोलीस व्हायचं होतं पण मला लहानपणीच तसं वाटायचं.
लक्ष्य लक्ष्य मधले सगळे पोलीस मोठेपणीच पोलीस झालेले आहेत.
आमच्या खालच्या मजल्यावर एक काका राहतात ते मोठे पोलीस आहेत.
ते ऑन ड्युटी चोवीस तास असतात.
ते कधी कधी जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना लवकर ओळखतच नाही.
म्हणून मला आता पोलीस व्ह्यायची भीती वाटते.
म्हणजे मला गुन्हेगार ओळखतील याची भीती वाटते असं नाही तर मला माझी आई ओळखणार नाही याची भीती वाटते.
सरळ सरळ बोलायची भीती वाटते म्हणून दुसऱ्या मजल्यावरचा सचिन पहिल्या मजल्यावरच्या वीणाच्या फेसबुकवर लिहितो.
आमच्या वरच्या मजल्यावर एक काका राहतात.
तेखूप लिहितात.
ते तत्वचिंतक आहेत असं ते स्वतः म्हणतात.
त्यांच्या वरचा मजला रिकामा आहे.
म्हणजे तिथे आता कुणी राहात नाही.
तत्वचिंतक म्हणजे काय असं मी त्यांनाएकदा विचारलं तेव्हा ते मला असं म्हणाले “घरी जा”.
मला वाटतं कि त्यांनाच त्याचा अर्थ माहित नसावा.
मी घरी जात असताना समोरच्या चाळीतला नरू मला म्हणाला," तू हॉट साप वर असतोस का?".
मी हॉट सीट ऐकलं होतं, हॉट साप पहिल्यांदाच ऐकतोय. आणि हॉट सापाच्या कल्पनेने जरा घाबरल्या घाबरल्या सारखं झालं.
पण हे हॉट साप म्हणजे काय त्याचा शोध घेऊन पुन्हा भेटीन तुम्हाला.

विझलेल्या मेणबत्त्या

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. पार्काजवळ कॉफी पीत असताना कॉलेजमधली एक युवती येऊन म्हणाली, “..We have organised a silent protest march seeking justice to the victim of the delhi gang rape. We would like you to join us. तिला स्पष्ट नकार देणं मला योग्य वाटलं नाही मात्र मी गेलोही नाही. थोड्याच वेळात तो मोर्चा निघाला. हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन, पेन्सील हिल्स घालून, छानपैकी मेक अप करून काही मुली “we want justice... we want justice” असं दबक्या आवाजात म्हणत चार पावलं चालल्या... चारंच. काही तरुण आणि काही काका-काकू पण होते. हे सगळं चालू असताना त्यातले चार दोन जण  (दुर्दैवाने त्यात दोन एक स्त्रियादेखील होत्या) एकमेकांकडे पाहून चक्क गालातल्या गालात हसत होते.... माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... केवळ अविश्वसनीय आणि भयंकर!! विषय काय, हसावं केव्हा...कुठे? थोड्याच वेळात सगळे पांगले. कॉफी पीत बसल्याबद्दल मला कुठेतरी खरं तर स्वत:बद्दल बरंच वाटलं मला.  
“we want justice...we want justice” असं रोडवर म्हणून फार तर काय होईल? या प्रकरणांमध्ये स्वतंत्र न्यायालयं स्थापन झाली, तरीदेखील सर्वोच्च न्यायालय,दयेचा अर्ज या मार्गाने अशा गुन्हेगारांचा जीवनप्रवास फासाच्या दोरीने संपेल. अतीव शारीरिक आणि मानसिक यातनांनी होरपळून निघालेल्या त्या तरुणीने कितीतरी दिवस मृत्यूशी झगडत अखेर देह ठेवलाच. आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि प्रत्यक्ष पशूंना शरमेने मान खाली घालायला लावील अश्या अतिविकृत पद्धतीने तिला जखमी करणाऱ्या नरपशूंचा वध मात्र काही सेकंदात होईल.
हि वेळ मोर्चे काढण्याची आणि मेणबत्त्या पेटवण्याची नक्कीच नाही. सत्य स्वीकारण्याची आहे. शिकण्याची आणि शिकवण्याची आहे, सावध राहाण्याची आहे.
मिलिअन डॉलर बेबी या चित्रपटातला एक प्रसंग आठवतो. बॉक्सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेतले क्लिंट ईस्टवूड हिलरी स्व्यांकला विचारतात, You forgot the rule. Now, what is the rule? ती म्हणते: Keep my left up? त्यावर ते म्हणतात, Is to protect yourself at all times. Now, what is the rule? मग ती उत्तरते, Protect myself at all times”.
Protect yourself at all times बस... हाच एक नियम लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे.
@ सौमित्र साळुंके
२७.०५.२०१३

"देवबाप्पा"

फारंच नास्तिक होतोय बुवा, मन थोडं खाऊ लागलं
भक्ति पोटी देवा चरणी पुन्हा मन धावू लागलं

घाई घाईत भल्या सकाळी दुचाकीला मारली टांग
देवादारी पोचलो मात्र .. माणसांची ही एव्हढी रांग!

ठीकाय म्हटलं उभे राहू, सहज होईल ती भेट कसली,
तेव्हढ्यात त्या रांगेलगत दूसरी छोटी रांग दिसली..

ताटकळत दर्शन घेण्यासाठी कॉमन माणसांचा एक क्यू
किंवा खिसा ढिला करा, चटकन व्हा 'प्रिविलेज्ड फ्यू'...

त्यात सुद्धा वजन असेल तर तुमची ओळख कामी येईल
झटकन येऊन पटकन जाल, डोळे भरून दर्शन होईल

ऐकून होतो देवापुढे राव रंक सगळे सेम
केव्हापासून देवबाप्पा स्टेटस बघून देतोय प्रेम?

काय करायचं उभं राहायचं की आत एंट्री थेट हवी?
दर्शन घ्यायचं देवाचं की घट्ट गळा भेट हवी?

आलं लक्षात सब झूठ, हे मार्केटिंग चं पेव आहे..
जागी थिजेल तो देव कसला, माणसा माणसात देव आहे..

हसणारा देव, रुसणारा देव, धावणारा देव, बसणारा देव
खेळता पड़ता, चालता बोलता, 'क्लीशेड एक्सप्रेशन' नसणारा देव

'देवा सारखी माणसं' देवाचं देवत्व टिकवतात
देव तेच जे माणसाला माणूस रहाणं शिकवतात

लहानपणी एक बरं असतं पापण्या अगदी सहज मिटतात
गोष्टीमधले देवबाप्पा स्वप्नात येऊन स्वत: भेटतात

सौमित्र साळुंके ("देवबाप्पा" २०१२)

निर्मळ दिवाळी

दिपावली हा सण अंधारातून तेजाकडे नेणारा सण आहे. छान तेवणारी मंद वात, फराळाचा दरवळ घरात असं त्याचं स्वरुप आहे.
मात्र आपल्यातलेच काही लोक फटाके वाजवून आनंद साजरा करतात.. मला सांगा फटाके कश्यासाठी वाजवायचे? त्याने काय मिळतं.
मी सांगतो... त्याने वातावरणातल्या प्राणवायुला, म्हणजे ऑक्सिजनला कार्बनडाय ऑक्साइड मिळतो.
म्हणजे आपण स्वतः ला आणि आपल्या घरातल्या लहानग्यांना विषारी वायुतच उभे करतो.
याच काळात अनेक निरोगी लोकांना दम्यासारखे आजार जडतात. ते आपल्या मूळेच!
फटक्यांच्या आवाजाने अनेकांना हर्ष होतो...
मात्र आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही की आजुबाजुच्या कुठल्या घरात नुकतच जन्मलेलं तान्हुलं असेल, आजारी व्यक्ती असेल, कुणाला हृदयरोग असेल.
या सर्व केसेसमधे मोठा आवाज हा भयंकर ठरू शकतो.
मूळात मोठा आवाज करून आनंदीत होणे हे मानसिक असंतुलनाचे लक्षण आहे आणि तसे आपल्यापैकी कुणाला वाटत असल्यास त्वरित मानसोपचार तज्ञाची भेट घ्यावी.
किमान उद्याच्या पिढीला तरी या विकारापासून दूर ठेवणे पालकांचे आणि नातलगांचे कर्त्तव्य आहे.
आता तुम्हाला वाटेल मग करायचे तरी काय?मी त्याचाही प्रयत्न करतो...
सुंदर रांगोळया काढ़ा,तुळशीपाशी मंद वात तेवू दया.नातेवाईकांना भेटा, बोलवा, शुभेच्छा दया.
सुट्टी घेतली आहे... उत्तम... तुमच्या आजुबाजुला अनेक ठिकाण आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता..मुम्बैचं घ्या...
लहान मुलांना घेवून तुम्ही राणी बाग़, नेहरू तारांगण, विज्ञान केंद्र (ई मोझेस रोड वरचं), हॉर्नबिल हाउस, त्या समोरच उत्तम वस्तु संग्रहालय, अंधेरीत असलेला मोनोलिथ,
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कर्नाळा पक्षी अभयारण्य, ओपन बस, अशी कित्येक ठिकाण दाखवू शकतो..
मुलं काय तक्रार करतील फटाके नाही दिल्याची?! फ़क्त तुमची इच्छा हवी...
चला साजरी करुया निर्मळ आनंददायी दिपावली!

@ सौमित्र साळुंखे
शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2014

सुखाची पहाट

रविवारची पहाट असते.. तो थोडं किर्र करून डोळे किलकिले करतो... मलाही जाग येते.. मग त्या हलक्या उजेडात तो माझ्याकडे डोळे किलकिले करून बघतो.. रविवारच्या जाणिवेने माझ्या झोपेची नशा आणखी गडद झालेली असते... तरीसुद्धा मला हे जाणवतं की त्याचा मूळचा चंद्रासारखा राजस चेहरा छान झोपेमुळे अगदीच पौर्णिमेचा चांद झालाय...

तो माझ्याकडे किलकिल्या डोळ्यांनी बघत असताना मी त्याला खात्री देतो, म्हणतो,"बाबा".. तेव्हढ ऐकून तो रांगत माझ्याकडे येतों, माझ्या डाव्या दंडावर त्याचा डावा कान आणि उजव्या पायावर त्याचा उजवा पाय मागे करून टाकतो आणि मला पाठमोरं बिलगतो.. त्याची हलक्याश्या घामाने ओली झालेली मान आणि गळा मला जाणवतो. मग मी त्याची माकडटोपी किंवा टकुचं काढून टाकतो.. आणि त्याच्या मुलायम सोनेरी केसांमधून बोटं फिरवून त्याचे चिप्पू चिप्पू केस जरा सैल करतो...एव्हाना त्याच्या घामाचा सुगंध मला तो अगदी कुक्कुलं होतं तेव्हाच्या घामाच्या सुगंधाची आठवण करता होतो...

मी बायकोला डोळ्यात आनंदाश्रु दाटलेले असताना एकदा सांगितलं होतं.. "शक्य असतं ना तर याच्या या घामाचा सुगंध एखाद्या कुपीत बंद करून ठेवला असता आणि माझ्या आयुष्याच्या अखेरीला, शेवटचा श्वास ती कुपी उघडी करून घेतला असता.."

... मला बिलगलेल्या पाठमोऱ्या चिमण्याला मी एकदा अपादमस्तक बघतो. आईच्या पोटात असल्यासारखा दोन्ही पाय पोटाशी आणि दोन्ही हात समोर ठेवून तो पुन्हा छान निजलेला असतो... माझ्या उजव्या हाताच्या तळव्यात त्याचा मोजातला पाय अलगद धरून मीसुद्धा गाढ झोपतो...

... एरव्ही उठा उठा, ऑफिसला नाही जायचं का? पाणी सोडलय... ब्रेकफास्ट तयार आहे, चला आता तो उठलाच आहे तर त्याला भरवू दे मला, रात्री दहाला खाल्लय त्याने... असं बोलणारी त्याची आई आज असं काही बोलत नाही... बछडयाच्या सहवासाला भुकेल्या बापाला आणि बाबाच्या कुशीत निजलेल्या बछडयाला ती "पोटभर" झोपू देते...

सौमित्र साळुंके (६ फेब्रुआरी २०१५)
(मानसरोवर ते सैंडहर्स्ट प्रवासात)

"अश्म्युगातला बाबा"

आपली मुलगी बाबांसोबत दंगा करण्याच्या मूडमधे आहे.. बाबांनासुद्धा तेच करायचं आहे. पण नकळत डोक्यात काटे टकटक करत पुढे चाललेले.. बॉस कालच म्हणाले होते, जरा लवकर ये उद्या, डेडलाइन जवळ आलीये आणि आपण अर्ध्यात पण नाही आहोत.  मुलीला फसवून दाराबाहेर पडताना चहासुद्धा घ्यायची इच्छा होत नाही. ती जी काही सात अट्ठाविस किंवा आठ चौदा असते ती पकडायला उसेन बोल्टला शरम वाटावी या स्पिडमधे तुम्ही पळता. कधी मिळते कधी हुकते. मिळाली तर ठीक पण हुकली तर जबर म्हणजे डबल मूड ऑफ़! असं वाटतं अश्म्युगात असतो (हे गृहीत धरून की तेव्हा काहीतरी बोली विकसित झाली असेल) तर कसं असतं?


मुलगी सकाळी सकाळी म्हणाली असती... "बाबाबा सकासाशा!"  (चला सश्याच्या शिकारीला जावुया)
मग तुम्ही म्हणाले असता, "नकोगा वाबोगाचावा नाता तिहातिया दुण्सो टापाटाका"  (वाघ चावेल नाहीतर हट्टी हत्ती सोंडेत धरून आपटेल)
मग ती चिडून आईला (जीने कुठल्या तरी जड़ीबुटिचा चहा कढत ठेवलाय) म्हणाली असती,"सपक्ला तार्भी वारिबा साटू नकाला सपकला वारिबा माटु"... (किती भित्रा नवरा आहे तुझा, मला नका आणू असला भित्रा नवरा)
मग तुम्हाला वाईट वाटलं असतं..
तुम्ही तड़क office bag सॉरी, दगडी भाला खांद्याला लावून तिला म्हणाला असता:

"ठूल झेमा परी
काशिरी रुकुन ययूया घरी, 
तिराती जम्मर वालचे मलाला
सव्वालाचा घाम्प्रून ताघ्लेला हुम्माला.
होप लिझा झिमा नझाला रिबारी
हुम्मान टोखाटा लोबलो चिगोष्ट खरी"


(ऊठ माझे परी,
शिकार करून येवुया घरी
रात्री मछर कडकडून चावले मला
अस्वलाचं पांघरुण घातलं होतं मी तुम्हाला
झोप नव्हती झाली माझी बरी
म्हणून खोटं बोललो, हिच गोष्ट खरी)


तुम्हाला ती "झेमाबाबाला.... झेमाबाबाला" म्हणत बिलगली असती आणि तुम्ही तुमच्या योकोबाला (बायकोला) म्हणाला असतां, "जाआ मूर्साय राफ्राय राका हां, लोकाम्बी लिमाली राता गबातो"  (आज सुरमई फ्राय कर हां, कोलमी मिळाली तर बघतो)


हट्टी हत्ती आणि चावरया वाघांचा एरिया टाळत तुम्ही मस्त फिशिंग नेट घेवुन गेला असता छोट्याश्या समुद्रसफरीला आणी तुमच्या परिराणी सोबत केली असती मासेमारी!!!


नको तो लैपटॉप, त्या डेडलाइन्स, त्या मीटिंग्स, एम् एस वर्डची सेटिंग, आणि अप्रूवलसाठीचं वेटिंग...


तुम्ही आणि तुमची बच्चू मासेमारीला,
कधी शिकारीला,
झाडांवर लटकायला,
जंगलात स्वैर भटकायला,
दगडाने ठिणग्या पाडत,
झाडावरचा मध काढत,
उंच डोंगरावर दोघींना घेवुन जात,
गुहेतून आणलेला शिधा,कुठल्याश्या सुळक्यावर बसून खात...
सूर्य उतरला की तुम्हीही उतरून तुमच्या घरी,
थंडीत दोघिंवर अस्वलीं पांघरूण
आणितुमची रात्रभर राखणदारी! :-)

सौमित्र साळुंके
१७ फेब्रुआरी २०१५


तळटीप: अश्मयुगात कुठून आली फिशिंगनेट आणि नाव, अश्मयुगात बोली भाषा नव्हतीच, ही बोली भाषा मराठी किंवा अरबी भाषेसारखी वाटतेय अश्या स्वरूपाच्या कमेंट्स करू नयेत. तसल्या खवचटपणावर फक्त माझी मक्तेदारी आहे :-) केवळ भावना लक्षात घ्यावी. माझी ज्ञानपीठासाठी शिफारस व्हावी असा माझा मानस नाही.

My view on Malhari Song from the Film “Bajirao Mastani”

In my opinion, this is not 'cinematic liberty' but 'cinematic frenzy'. Cashing in on some successful formula (I felt as if I'm listening to tatad tatad and aata majhi satakli combined) isn't what cinematic liberty is for. The reason I am saying this is that the character depicted here is not fictitious. Shrimant Bajirao Peshwa is a legend; most revered Prime Minister of Maratha Empire. A Field Marshal, one of the super-finest cavalry leaders of all times, a strategic mastermind. He is the man who ate, slept and almost lived his life on horseback.
Consider this:
"A masterpiece of strategic mobility" - British Field Marshal Bernard Montgomery describing Battle of Palkhed in his book, The Concise History of Warfare
“He died as he lived, in camp under canvas among his men, and he is remembered to this day among the Marathas as the fighting Peshwa…” - English historian Sir Richard Carnac Temple, Shivaji and the Rise of the Mahrattas
“Bajirao was a heaven born cavalry leader. In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao was unequalled for the daring and originality of his genius and the volume and value of his achievements” - Sir Jadunath Sarkar, foreword in V.G. Dighe's, Peshwa Bajirao I and Maratha Expansion
“He had both head to plan and muscle to execute” - James Grant Duff on Bajirao I
“Bravest of the brave, fairest of the fair, Bajirao died like the most fascinating figure in a romance of love” – Denis Kincaid, History of Maratha People
As we are aware, वाट लावली (waat laavli) and अतरंगी (atrangi) are slangs which were not even existing in his times.
And now, much discussed choreography.
Since the person being portrayed is man of such stature, all the moves and mannerisms given to the lead actor are skewed. I can’t watch him beat the drum with electrified head (Tatad Tatad Part II) or climbing onto the back of fellow soldier who is all on fours. I doubt a man who became the Prime Minster of Maratha Empire at the age of 19 and led the cavalry in fierce battles would do such shoulder shrugs and chest slides…
My point is - - - - keep the grace and the dignity of the characters (more particularly when the character is not imaginary but the real one) at all times. In Jodha Akbar, Ashutosh Govarikar could have used Hritik’s skillsets to draw people to the theatres by some catchy number like
धीनक धीनक धीनक धीनक
मै तो हू शेहेंशा
फटक फटक सटक सटक
कदमो में ये जहां
(dhinak dhinak dhinak dhinak
mein to hoon shehensha,
fatak fatak satak satak
kadmomein ye jahaan …”
He instead chose to do “Khwaja Mere Khwaja” which touched the souls.
In short, if you have read about Bajirao I and have understood what magnificient persona he had, you will be disappointed watching songs like Malhari.
I don’t even wish to say anything about Pinga Song here. Is it just for old times’ sake? Just to revive the magic of Dola re??
I hope the movie portrays him, Kashibai and Princess Mastani rightly.
As of now, mere mood ki to waat lagali!!!
Saumitra Salunke 8th December 2015

Saturday, January 16, 2016

Chaitra and Vaishakh

Tigress "Chaitra" travels 80 kilometers for her Tiger "Vaishakh".
Call it love or call it lust. This is phenomenal.
My brief poetic tribute to Chaitra, the Tigress. 

"चैत्रा" आणि "वैशाख"

जाळत होता विरहिणीस
वणवा "वैशाखाचा"
मुक्यामुक्याने पायपीट
आधार अंधाराचा

किती चालली... किती मोडले
पायांमधून काटे
थिजून गेल्या गर्द वनाला
तिची काळजी वाटे

कुठे हरवला साजन वेडा
कि रमला एकलकोंडा?
कि कुठल्याश्या सवतीसोबत
बसला घोळत गोंडा??
.....
तश्यात अवचित भेट घडावी
नजरेला मग नजर भिडावी
कातर हळवा तोही वेडा
पुन्हा नव्याने प्रीत जडावी

अंधारा मग चांदणभूल
आवेगाची उडते धूळ
पहाट जेव्हा दवात न्हाली
तेव्हा विझले वियोगखूळ

पुन्हा पुन्हा मग भेट लाघवी
विरहपीडेचे दिप मालवी
सुकून गेल्या वैशाखाला
पुन्हा नव्याने चैत्र पालवी!

- सौमित्र साळुंके
Copyright @ Saumitra Hanmant Salunke

Loksatta-Chaitra-Tigress-Vaishakh-Tiger-wandering-80 kilometersmaharashtra-news/to-search-a-partner-tigress-wanderings-80-km-in-chandrapur-district-1188457/ 

Saturday, January 9, 2016

When you should NOT watch Natsamrat

When you should NOT watch Natsamrat:

1. If you dislike theater;
2. If you are too conservative, i.e you dislike even the good adaptations of classic literature or plays;
3. If you cannot think of characters in any other colour than black or white;
4. If you are 'okay' with not having watched some epic scenes (including Vikramji-Nana's deathbed scene) on the big screen;
5. If you are averse to accepting the fact that this performance of Nana (and Vikramji) is few light years ahead of any of the Bollywood performances in recent times

......................
लॉ कॉलेजला असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ग्रंथालयात बसून एका बैठकीत संपूर्ण नटसम्राट वाचून काढलं होतं. मी ते नाटक कधी पाहिलं नव्हतं मात्र तात्यासाहेबांच्या शब्दांची जादू अशी आहे कि सर्व पात्र जिवंत झाली होती; माझ्या आजूबाजूलाच नाटक चालू आहे असं वाटत होतं.
माझा नाटकांशी (एकांकिकांच्या रूपाने) काही संबंध असल्याने आणि या कलाप्रकारावर माझं अतोनात प्रेम असल्याने हा चित्रपट चुकवायचा नाही हे निश्चित होतं. त्याला अनुसरून मी शेवटच्या दिवशीच्या शेवटच्या "प्रयोगा"ला हजेरी लावली.

मला हा संपूर्णपणे "Actor's Movie" वाटला. मुळात ज्या कलाकृतीवर हा आधारित आहे ती कलाकृती हिमालयासारखी. त्यात किरण यज्ञोपवीतचे संवाद त्या उंचीला धक्का लागू देत नाहीत. मूळ नाटकातल्या संवादाला जोडून येणारे चित्रपटातले संवाद प्रवाहाला बिलकुल तोडत नाहीत हि मोठी जमेची बाजू आहे.

आता अभिनय...

काय बोलायचे?

नाना आणि विक्रमजींचे एकत्रित प्रसंग अभिनयाचे विद्यापीठ आहेत. मी कैक दिवसांनी थेटरात बायकोच्या बाजूला बसून बायकोपेक्षा जास्त रडलोय. त्यामागे कारण आहे. मला गोखलेंनी खूप रडवलं. मी बरेच म्हणजे खरेच बरेच देशी विदेशी चित्रपट पहिले आहेत (हजारोंच्या घरात). अस्सलपणा असल्याशिवाय मला रडू येत नाही. त्या दोन्ही बाप लोकांनी पुरुषाचं मन ज्या पद्धतीने व्यक्त केलंय त्याला शिरसाष्टांग नमस्कार... दंडवत!!!

संवादातून कळणारी यौवनातली बेफिकिरी, विलासीपणा, सर्वस्व देऊन टाकण्यातला अविचारी उत्स्फुर्तपणा, पत्नीवरचं प्रेम, तीच्यावाचूनचा असहायपणा - पोकळी, नातीवरचा जीव, एकाची पोर नसण्याने आणि दुसऱ्याची पोरं असतानाही आलेली अगतिकता... किती किती म्हणून कंगोरे असावेत??? आणि तेही किती किती खरेपणाने आणि सहजतेने व्यक्त करावेत? राम्याचं हे पात्र नाटकातलं नाही असं वाटतच नाही. कर्ण मृत्युशय्येवर पडलेला असताना युगंधरासोबतचा प्रसंग, to be or not to be ची सोलीलोकी आणि चित्रपट संपल्यानंतरचा संवाद हे चित्रपटातले उच्चतम बिंदू आहेत. आणि याचा पडद्यावर अनुभव घेतल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. एव्हढे मोठे आणि अभिजात आणि पल्लेदार संवाद बोलणे आणि यत्किंचितही भडकपणा न येऊ देता भावनावेग दाखवणे हे एक शिवधनुष्य आहे आणि नाना ते शिवधनुष्य लीलया पेलणारे नटसम्राट.

मेधा मांजरेकरांचा अभिनय नैसर्गिकपणे संयत आहे. एक फलंदाज षटकारामागे षटकार ओढत असताना अदर एंडला हा असा ग्रेस टिकवून ठेवायचा असतो. त्यांच्या तोंडचा "समोरचं ताट द्यावं पण बसण्याचा पाट देऊ नये" हे वाक्य संपूर्ण नाटकाची सेन्ट्रल थीम आहे. या दोन stalwarts समोर मांजरेकरांच्या व्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे आत्मविश्वासाने उभी राहिली आहे. इतर सर्व व्यवस्थित आहेत.
चित्रपट अजूनही बऱ्याच चित्रपटगृहात आहे. तडक जा आणि तिकीटं काढा.
सौमित्र